Posts

Showing posts from January, 2021

Khanachi fajiti

Image
            शायिस्ताखानाची फजिती शायिस्ताखानाची स्वारी : विजापूरच्या आदिलशाहाने जंगजंग पछाडले, पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही. त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशाहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. मुघलांच्या स्वाच्यांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती. त्या वेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाहा होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशाहा चिडला. त्याने आपला मामा शायिस्ताखान याला शिवरायांवर पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याच्याबरोबर पाऊण लाख सैन्य होते. शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर सासवड अशी गावे घेत घेत शायिस्ताखान पुष्य आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढेपुढेच येत होता, पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ, भीमथडी तट्टावर बसणारे! चटणी भाकरी खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरद...

Pavan khind

Image
                      पावन खिंड  पन्हाळा जिंकला आणि आदिलशाहा चिडला : अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशाहा भयंकर चिडला. त्याला अन्नपाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जौहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्दी जौहर निघाला. फाजलखानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला. पन्हाळगडचा वेढा : सिद्दी जौहर शूर पण क्रूर होता. त्याची शिस्त कडक होती. त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला. शिवरायांना गडात कोंडले. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. पावसाळा सुरू झाला, की सिद्दी जौहर वेढा उठवील असे शिवरायांना वाटले, पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरची शिदोरी संपत आली. आता काय करावे ? शक्तीचे काम नाही, तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले. "लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो, असा निरोप त्यांनी सिद्दीला पाठवला. तो खूश झाला. त्याने ते कबूल केले. वेढ्याच्या कामाने सिद्दीचे सै...

Pratapgadavaril parakram

Image
  🚩  प्रतापगडावरील पराक्रम 🚩 आदिलशाही हादरली : विजापूरच्या दरबारातील गोष्ट. शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला. दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले. एकेक गाजलेले समशेरबहाद्दर दरबारात हजर होते. आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीण जातीने दरबारात हजर होती. दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता- शिवाजीचा बीमोड कसा करायचा ? बडी साहेबीण हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला, "सांगा, कोण तयार आहे १. शिवाजीचा बंदोबस्त करायला ?" दरबारात शांतता पसरली. जो तो आपल्या जागी चूप! शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार? जो तो एकमेकांकडे बघू लागला. एवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव होते अफजलखान. खानाने विडा उचलला : तबकातील विडा उचलत अफजलखान म्हणाला, "शिवाजी ? कुठला शिवाजी ? त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतोच आणतो." अफजलखान म्हणजे विजापूर दरबारचा भारी सरदार. तुफान ताकदीचा ! पोलादी पहार हातांनी वाकवणारा. भल्याबुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात...

Cht.shivaji maharaj

Image
      स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा रायरेश्वराचे देवालय :- पुण्याच्या नैर्ऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. तेथे १६४५ साली एक विलक्षण घटना घडली. शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होती. त्या किर अरण्यात झाडाझुडपांत लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत ते मावळे करत होते ? श्रीशंकरापाशी कोणते मागणे मागत होते ? बालशिवबाची तेजस्वी वाणी : शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले, गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हांला येथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व कसे छान चालले आहे, पण गड्यांनो, मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसर्याच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे का? आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. आपली माणसे या यु...

Shivaji maharaj

Image
                शिवरायांचे शिक्षण शिवरायांच्या शिक्षणास प्रारंभ : स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गाढे पंडित होते. त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. तेथे वयाला सात वर्षे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. थोड्याच काळात शिवराय लिहिण्या- वाचण्याच्या कलेत पारंगत झाले. रामायण, महाभारत, भागवत यातील गोष्टी ते स्वतः वाचू लागले. शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांनी शिवरायांस घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विदया शिकवण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला. लवकरच आदिलशाहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्ये जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ व शिवराय यांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली. त्या वेळी त्यांच्याबरोबर शहाजीराजांनी हत्ती, घोडे, पाय...

Maratha sardar

Image
      मराठा सरदार - भोसल्यांचे  कर्तबगार घराणे  धामधुमीचा काळ : संतांनी लोकांच्या मनांत भक्तिभाव निर्माण केला, तर शूर मराठा सरदारांनी  महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. विजापूरचा आदिलशाहा आणि अहमदनगरचा निजामशाहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांना फौज लागे. या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. शूर मराठा सरदार : मराठे काटक व शूर होते. तसेच ते धाडसी होते, स्वामिनिष्ठ होते. लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला, की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई. कधीकधी जहागीरही देई. जहागीर मिळालेले सरदार स्वत:ला आपल्या जहागिरीचे राजे समजत. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते. त्यांत सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे...

Santachi kamgiri

Image
                संतांची कामगिरी        महाराष्ट्रात श्रीचक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली संतपरंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालविली. या संत मंडळींमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महंमद, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो. त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिऊरकर यांचाही अंतर्भाव होतो. त्यांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनांत निर्माण केली. तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी आपले कार्य केले. श्रीचक्रधर स्वामी : श्रीचक्रधर स्वामी मूळ गुजरातमधील एक राजपुत्र. वैराग्यवृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले. येथे भ्रमण करत असता त्यांनी समतेचा उपदेश केला. त्यांना स्त्री पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते.त्यामुळे त्यांना अनेक...

Shivrayanche balpan

Image
            शिवरायांचे बालपण  शिवजन्म : ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाहा शाहजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे. विजापूरच्या आदिलशाहाने ते बेचिराख करून टाकले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर ! शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. अशात जिजाबाई गरोदर होत्या, तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे करे हा प्रश्न उभा राहिला. शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील किल्ला. त्याच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट - दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले. आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३०. ...

Army recruitment 2021

Image
  (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO कोल्हापूर] ARO Kolhapur Army Recruitment Rally 2021 Indian Army Recruitment Rally,  ARO Kolhapur Army Recruitment Rally 2021 (Kolhapur Army Bharti Rally 2021) for  Soldier General Duty, Soldier  Technical, Soldier Technical, Soldier Clerk/ Store Keeper Technical/ Inventory Management, Soldier Tradesman, and Soldier Technical Nursing Assistant, Posts. Kolhapur, Solapur, Satara, Sangli, Sindhudurg and Ratnagiri of Maharashtra State and North Goa & South Goa districts.  www.majhinaukri.in/aro-kolhapur-army-recruitment-rally सहभागी जिल्हे:  कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि उत्तर गोवा & दक्षिण गोवा. पदाचे नाव & तपशील:  पद क्र. पदाचे नाव 1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD) 2 सोल्जर टेक्निकल 3 सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक) 4 सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)  5 सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)  6 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅ...